मी श्री रामप्रसाद माणिकराव डोईफोडे माझ्या ब्लॉग वरती आपले सहर्ष स्वागत करतो.


माझ्या ब्लॉगला आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद

करियर निवडतांना

करियर निवडतांना


खाली क्किक करा तुम्हाला करीयरच्या उपलब्ध असणाऱ्या  १२० पेक्षा अधिक संधी पाहायला भेटतील .       करीयरच्या विविध संधी 

१० वी व १२ वी नंतर पुढे काय ?


हा प्रश्न खरंतर आज सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. जो तो आपआपल्या परीने उत्तरं शोधत असतो,बहुतेकदा शेजारी-पाजारी नातेवाइक फारफार तर एखादे वर्तमानपत्र ह्यांची मद्त सामान्य पालक व विद्यार्थी घेतात. .

करीअरची दिशा ठरवण्याचा योग्य काळ कुठला ?

करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे
आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी. ज्या प्रमाणे कोणत्याही गोष्टीचे नियोजन केल्याने ती गोष्ट जरी कमी असली तरी पुरते हा आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव असतो, तसेच करीयरचे नियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात.

कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा हे कसे ठरवावे ?
पालकांनी व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. दहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. बर्‍याचदा गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो.

1 सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 2 विद्यार्थ्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहे, हे समजून घ्या.
3 मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत? त्याचे मन त्या विषयात रमेल काय? याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे.
4 त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवर डगमगतो.
कोणते करियर योग्य ठरेल हे कसे तपासावे ?
कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.

मुलांच्या मार्गदर्शनाची दिशा काय असावी ?
भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळव हे तर दहावी झाल्यावर सर्वांचे स्वप्न असते. विविध प्रकारच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलेल्यांची समाजाला गरज असते. या कौशल्याच्या जोरावर सा व प्रतिष्ठा मिळते. पालकांनी विद्यार्थ्यांना या बाबी सांगितल्या पाहिजेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना व्यवहारज्ञान फारसे नसते. त्यांना अभ्यास एके अभ्यास या पलीकडे काय असते याची जाणीव नसते. त्यामुळे चांगल्या करीयरची निवड करताना ते गोंधळून जातात. या परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. मुलाच्या चांगल्या करीयरच्या दृष्टीने आपल्या शहरात अथवा शहराबाहेर कुठल्या महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती काढावी..


पूढील विषयांचे प्रश्न विचारा तर ..
करिअर
- विविध टिप्स
- दूरशिक्षण
- कोर्स नुसार प्रश्न व माहिती
- शिक्षणानुसार मार्गदर्शन
सल्ला मार्गदर्शन
- १० / १२ वी नंतर पुढे काय ?
- चाकोरी मोडा / वेगळ्या वाटा
- आदर्श वास्तु कशी असावी ?
कोर्स नुसार प्रश्न
- माहितीचा अधिकार
- गाहक संरक्षण कायदा
- तक्रार करायची आहे ?
- गृहनिर्माण सोसायटीचे प्रश्न
क्षेत्रानुसार संधी
- सरकारी नोकरी
- दूरशिक्षण
- कोर्स नुसार प्रश्न व माहिती
- शिक्षणानुसार मार्गदर्शन



करिअर संदर्भात आपले काही काही प्रश्न 
  1. संरक्षण खात्यात नोकरीच्या काय संधी आहेत ?
  2.  U.P.S.C ची पदे कशा पद्धतिने पद प्राप्त होते ?
  3. १० वी व १२ वी तसेच पदवी नंतर पुढे काय ?
  4. कोणा कडून माहिती घेऊ शकतो ?
  5. माहिती म्हणजे नक्की काय ?
  6. माहिती अधिकार म्हणजे काय?
  7. माहितीचा अर्ज कसा सादर करावा ?
  8. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे कोण ?
  9. १० वी व १२ वी तसेच पदवी नंतर पुढे काय ?
शैक्षणिक धोरणाच्या प्रत्येक राज्याचा व केंद्रसरकारचा विचार व पद्धत व अभ्यासक्रम जरी वेगवेगळा असला तरी वैचारीक बैठक मात्र सार्खीच आहे . १० वी नंतर ३ मुख्य शाखा निर्माण केलेल्या आहेत.
१ . कला 
२ . वाणिज्य (कॉमर्स)
 ३ . विज्ञान 
ज्यांना आपल्या शैक्षणीक जीवनात मग ते पारंपारीक शिक्षण असो की पदवीका असो यापैकी एका मार्गाची निवड करावी लागते. मात्र व्यवसायीक शिक्षण व डिप्लोमा यासाठी १० वी नंतर प्रवेश मिळ्तो.

तरीही विद्यर्थ्यांनी शक्यतो १० वी नंतर जरी डिप्लोमाला किंवा व्यावसायीक क्षेत्राची नि वड केली तरी बाहेरुन १२ वी परीक्षा पास करावी. विद्यार्थ्यांनी विषयाची निवड करताना विशेष  काळजी घ्यावी जेणे करुन त्यांचे भविष्य उज्वल होइल . क्षेत्राची निवड करताना स्वतःची आवड, अभ्यास करण्याची क्षमता ( भविष्यात याच क्षेत्रात आयुष्य्भर काम करयचे आहे याची जाणीव ठेवणे. ) तसेच त्याक्षेत्राची भविषात करीअर विषयक संधी कश्या आहेत याचा विचार करुनच निवड करावी.
खाली दिलेल्या क्षेत्रां पैकी क्लीक केल्यास त्या क्षेत्रातील संधींची माहीती मिळेल .
मुलगा /मुलगी १०वी, १२वी आणि पदवी झाले पण करियर कोणते निवडावे  हे कळत नाही यासाठी प्रत्येक घटकाचा विचार करून खास पालक व मुलासाठी करीयरच्या संधी व त्याची तपशीलवार माहिती 

1 comment: